Thursday, March 31, 2016

कल्पनाच पण अशी हवी !



एक ग्रुप एड्मीन काही दिवसांपासून सतत च्या चेटिंग मेसेजस मुळे  हैराण झाला होता, दर दोन मिनिटात मोबाईल वर  मेसेजचा  'टुंग ' असा आवाज येत होता. भरीस भर म्हणून मधूनच 'आ s s s s s शांताब्बाई' अस कोणीतरी बोम्बलेले  वोईस मेसेजेस, व्हिडीओ  आणि ग्रुप चेटिंगमध्ये एकमेकांना दिलेल्या भयंकर शिव्या, हे असला धिंगाणा सुरु झाला कि एक दोन तास गप्प बसण्याच कोणी नाव घेत नसे. ही रोजची कटकट झाली होती म्हणून अखेर त्या एड्मीनने ग्रुप डिलीट करायचा निर्णय घेतला, पण यावर काही उपाय सुचतोय का हे पाहण्यासाठी थोडा वेळ घ्यावा अस ठरवलं, फक्त उपाय असा पाहिजे होता कि हे चेटिंग मेसेजस बंद न होता यामधून काहीतरी चांगली गोष्ट घडावी. नक्की काय करायचं हेच एड्मीनला सुचत नव्हते आणि दोन दिवसानंतर तो ही  हे सर्व विसरला आणि आपला कामात व्यस्त झाला तोपर्यंत अधूनमधून शांताबाई, गण्या, बंड्या, बाई  आणि मास्तर यांचा ग्रुपवर धिंगाणा चालूच होता.

एका संध्याकाळी एड्मीनने त्याच्या सोसायटी बाहेर 'दोन दिवस पाणी येणार नाही' असा फलक वाचला, महानगरपालिकेने पाणी कपात केली आहे हे समजले त्यामुळे सोसायटी अध्यक्षाला बोलून काही उपयोग नव्हता, पाणी कपातीचा पहिला दिवस संपला आणि एडमीनच्या घरातील पाण्याचा साठासुद्धा पहिल्याच दिवशी संपला आणि त्याच दिवशी संध्याकाळी एडमीन पाण्यासाठी सोसायटीच्या आवारात पाण्याच्या टेंकर मागे रांगेत उभा होता. 'दोन्ही हातात दोन बादल्या घेतलेला एडमीन'  अशा अवतारात त्याचा ग्रुपवर आणि फेसबुकवर फोटो प्रसिद्ध झाला. दुसऱ्या दिवशी तर पिण्याच्या पाण्यासाठी एडमीन मिनरल वॉटरच्या बाटल्या शोधत फिरत होता. महानगरपालिकेच्या कृपेने दोन दिवसानंतर पाणी पुरवठा नियमित झाला होता पण पुन्हा पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही याची काहीच शाश्वती नव्हती.
    
या दोन दिवसात पाण्यासाठी झालेल्या त्रासातून ग्रुपवर येणाऱ्या फालतू मेसेजस काय करायचं यावर एडमीनला उपाय सुचला होता आणि त्याप्रमाणे तो कामाला लागला. प्रथम एडमीनने  जो जास्त फालतू मेसेज पाठवण्यात वेळ घालवतो अशा एका ग्रुप सदस्याला ग्रुपमधून काढून टाकले आणि त्याला फोन कॉल केला आणि तो सदस्य जिथे राहतो तिथल्या पाणी पुरवठा स्थिती विषयी माहिती घेतली असे करून एक एक करत जवळपास ४२ जणांना ग्रुप मधून काढून त्याने फोन कॉल केले आणि माहिती घेतली तर जवळपास सर्वजण पाणी प्रश्नामुळे वैतागले होते  सर्व उपनगरात हीच स्थिती होती आणि मे  महिन्यापर्यंत ही परिस्थिती अजून भयानक होणार होती याची जाणीव सर्वांना एडमीनने करून दिली आणि त्यासाठी कमी वेळखाऊ पण परिणामकारक काम करण्याची विनंती केली आणि आश्चर्य म्हणजे सर्वजण तयार झाले.

आता एक नवीन नावाचा ग्रुप तयार झाला होता. ग्रुपचे नाव होते 'एक बादली पाणी' एडमीन तोच होता ग्रुप सदस्य तेच होते फक्त ग्रुपचे नाव आणि मेसेज पूर्ण बदललेले होते. ग्रुप मध्ये ४२ सदस्यापैकी ३६ सदस्य अतिशय उत्साही होते. प्रत्येकाला रोज आपल्या रोजच्या वापरातील कमीतकमी १ बादली पाणी वाचवायचे होते आणि त्यासाठी काही उपाय प्रत्येकाने शोधून ग्रुपवर पोस्ट करायचे होते. सुरवातीला काही उपाय एडमीनने सुचवले.

१) घरात पाण्याची टाकी सोडून इतर भांड्यात असणारे पाणी ओतून न देता एका बादलीत साठवायचे आणि ते कपडे, भांडी धुण्यासाठी वापरायचे. 

२) बाथरूमच्या वर बसवतात त्या टाकीतील पाण्याचा उपयोग इतर भांड्यातील पाणी संपल्याशिवाय करायचा नाही. 

३) पाण्याचा नळ सोडून ब्रश करणे, दाढी करणे असली कामे करायची नाहीत.

४)  शॉवर चा वापर टाळून आणि आपली गरज ओळखून पाणी टाकीतून घ्यायचे.

पाणी वाचविण्यासाठीचे असे अनेक उपाय एकमेकांना सुचवून या ग्रुपने गेल्या ४० दिवसात प्रती माणसी कमीतकमी १ बादली खाली दिल्याप्रमाणे पाणी वाचवले. प्रत्येक दिवशी आपापले पाणी वाचविण्याचे  मेसेजेस, व्हिडीओ शेअर केले.         

 ३६ सदस्य X  १ बादली (१८ लिटर) = ६३८ लिटर प्रत्येक दिवसाला पाणी वाचविले
६३८ लिटर X ४० दिवसात =  सुमारे २५५२० (पंचवीस हजार पाचशे वीस लिटर पाणी वाचविले. -अजून पाणी वाचवा मोहीम चालूच आहे)  

आपल्या सर्वांकडून नकळत दिवसभरात कितीतरी पाणी वाया जात असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो त्यावर थोडे लक्ष देऊन आपण ही 'पाणी वाचवा' ही मोहीम राबवू शकतो. पण गरजे पेक्षा जास्त मिळणाऱ्या वस्तूला मोल नसते. तुम्ही कोणाला काही सांगायला गेलात तर अशी उत्तरं येतील की " पृथ्वीवर ७१ टक्के पाणी आणि आणि २९ टक्के जमीन आहे'  त्यावेळेस अस उत्तर दया कि ७१ टक्के पाणी आहे मग १ लिटर पाण्यासाठी लाज नसल्यासारखे २० रुपये का मोजता ?       

Tuesday, March 1, 2016

माझी गोवा 'वारी'

'मी गोव्याचा brand ambassador झालो तर?' या विषयावर मी खूप छान निबंध लिहू शकतो. गेल्या १५ वर्षात मी  ४ वेळा गोव्याला जाउन आलो. थोडक्यात गोवा हे माझं आवडत ठिकाण आहे!  दरवेळी गोवा भेटीत माझ्याबरोबर वेगवेगळे मित्र होते. यावेळी वास्को वास्तव्यास होतो त्यामुळे पणजी आणि गोव्याचे प्रसिद्ध समुद्रकिनारे यापासून बराच लांब प्रवास करून जावं लागत असे. दुचाकीचा पर्याय होता पण पहिला दिवस प्रवासाने थकलो होतो आणि तो दिवस वाया जाऊ नये म्हणून दुचाकीवरून वास्को जवळ एक 'बोगमालो' नावाचा समुद्रकिनारा आहे तिथे गेलो . इतर ठिकाणापेक्षा या समुद्रकिनाऱ्यावर कमी गर्दी असते. पहिला दिवसभर याच समुद्र किनाऱ्यावर आम्ही फिरत होतो.  संध्याकाळी वाळूत मित्रां बरोबर गप्पा मारत बसलो होतो अंधार पडू लागला तेव्हा मित्रांपासून हळूच थोडा दूर येऊन समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ गेलो आणि दूरवर एक जहाज होत त्याकडे पाहत बसलो. त्या दिवशी भरती असल्यामुळे मोठा आवाज करत फेसाळणारया लाटा किनाऱ्यावर येऊन पुन्हा त्याच वेगाने परत समुद्रात मिसळत होत्या. हे किती तरी वेळ स्वतःला विसरून पाहत होतो. जगात कितीतरी गोष्टी विशाल आहेत पण मला समुद्राच विशालपण खूप अवर्णनीय वाटत. काही वेळाने मित्रांची बोंब ऐकायला मिळाली आणि मुकामाच्या ठिकाणी निघालो.


वास्को हवाई अड्डा ज्याला 'गोय' किवा 'देबोलियम' ऐअर पोर्ट म्हणतात तिथुन एक किलोमीटर जवळ आम्ही तळ ठोकून होतो. पहिल्या दिवशी दुपारी आम्ही मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो साधं पण बऱ्यापैकी हॉटेल होत ते , जवळच काही मंडळी 'शांभवी' घेत बसले होते. दारू …! त्यांच्याकडे पाहून आणि त्याचं बोलण ऐकून अस वाटत होत कि रोज सकाळी आणि संध्याकाळी थोडीतरी घेतली पाहिजे असा गोवा वासीयांचा नियम असला पाहिजे. तस गोवा आणि दारू हे नात खूप सहज जोडलं जात कारण एकतर तिथं एकामागोमाग दारूची दुकान असतात, आणि तीथे ती स्वस्तही मिळते आणि पिवुन तुम्ही गाडीही चालवू शकता.  ड्रंक अंड ड्राऐव्ह हा नियम नाही (कृपया मी दारूचा उदोउदो करत नाही) कारण आताच नटसम्राट चित्रपटाची समीक्षा वाचली होती. त्यात दारूपुराण बरच सांगितलं होत अस समीक्षकाच म्हणण होत पण शांभवी हा नवीन शब्द मला याच चित्रपटातून ऐकायला मिळाला, असो पण गोव्यातला  बिनधास्तपणा तिथल्या वातावरणाला शोभून दिसतो हे वास्तव आहे.

गोव्यात मध्यमवर्गीय लोकांना परवडतील अशी हॉटेल सहज मिळत नाहीत. आणि भुकेच्या तडाख्यात आपण एखाद्या हॉटेलात गेलो तर चांगलं जेवण मिळेलच याची शाश्वती नाही. आणि इथे भरपूर समूद्र किनारे आहेत म्हणजे प्रत्येक हॉटेलात वेगवेगळ्या प्रकारचे मासे खायला मिळत असावेत हा फक्त एक समज आहे. त्यामुळे चांगला दर्जा ठेवला तर गोवा हे हॉटेलिंगच्या व्यवसायात पडू पाहणाऱ्या एखाद्या मराठी माणसाला उद्योगाच प्रवेशद्वार होऊ शकत. बाकी समुद्राजवळ आणि  पणजी, वास्को, तसेच मडगाव या शहरात स्वच्छता चांगली ठेवली आहे . रस्ते रुंद आहेत, ठिकठिकाणी पोलिस दिसत नाहीत पण अपघात सुद्धा जास्त पाहायला मिळाले नाहीत.

गोवा उशिरा स्वतंत्र झाला येथे पोर्तुगीजाचं राज्य होत, देशात सर्वाधिक परदेशी पर्यटक गोव्यात येतात त्यामुळे इथल्या लोकांच्या किंवा मुळातच गोव्याच्या संस्कृतीला वेगळा मुलामा आहे, म्हणून इथे आलेले देशी पर्यटक यात काही दिवस हरवून जातात. दरवेळी प्रमाणे माझी ही गोवा 'वारी' संपली होती पण परतीच्या प्रवासासाठी माझा पाय निघतच नव्हता.