Thursday, June 5, 2014

विमान आणि मराठी माणूस

विद्यार्थी किवा लहान असताना आपण जे वाचतो जे लिहतो आणि ऐकतो तेच आयुष्यभर आपल्या लक्षात राहते कारण बुद्धीची पाटी कोरी असते, आणि येणाऱ्या पिढीला पण आपण तेच सांगतो पण त्यातल्या सर्वच गोष्टी, माहिती बरोबर असते असं नाही. पूर्वी मिळालेली माहिती कधी आपण पडताळून पाहतोच असं पण नाही किवा आपल्याला त्याची गरज वाटत पण नसेल, पण जेव्हा आपण जे लहानपणापासून ऐकत, वाचत आलो आहे त्यापेक्षा अगदी वेगळी माहिती मिळाली कि आपण अचंबित होतो.

विमानाचा शोध कोणी लावला असा प्रश्न आला तर आपल्या  तोडांत पटकन नाव येत ते अमेरिकेतील 'राईट बंधु' यांचं कारण शाळेत असताना आपल्याला हेच शिकवलं गेल आणि जास्त काही माहित असेल तर आपण त्याचं साल सांगतो १७ डिसेंबर  १९०५. पण त्याच्या आठ वर्ष अगोदर एका मराठी व्यक्तीने विमानच यशस्वी उड्डाण करून दाखवलं  त्यांचं नाव आहे   'शिवकर बापुजी तळपदे '
                                                      शिवकर बापुजी तळपदे याचा जन्म मुंबईतील चिरा बाजार येथे सन १८६४ साली झाला. त्यांनी संस्कृत आणि वेदांचा अभ्यास  केला. विमानशास्त्रात त्यांना रुची होती. आपल्या देशात  विमानशास्त्राचे सर्वात मोठे वैद्यानिक मानले जातात ते महर्षी भारद्वाज त्यांनी  विमान शास्त्रावर आधारित सर्वात पहिले पुस्तक लिहिले तेही जवळपास १५०० वर्षांपूर्वी आणि त्यानंतर  शेकडो पुस्तके लिहली गेली, पण त्यांचे मूळ पुस्तक शिवकर बापुजी तळपदे याना मिळाले त्यानी ते पुस्तकाचे पान अन पान वाचून काढले. या पुस्तकात आठ अध्याय आहेत आणि त्यामध्ये विमान बनवण्याचे सर्व तंत्रज्ञान आहे, आठ अध्यायात जवळपास १०० खंड आहेत ज्यामध्ये सर्व विस्तारित माहिती दिली आहे, आणि महर्षी भारद्वाज यांनी विमान बनवण्याचे ५०० सिद्धांत दिले आहे आणि त्यातील एका सिंधान्तावर एक विमान बनवता येते, या ५००  सिंधान्तावर ३००० श्लोक आहेत.
                                                    प्रत्येक तंत्र विकसित करण्यासाठी जी प्रोसेस असते तशीच या प्रत्येक तंत्राला ३२ प्रकारची प्रोसेस आहे, असा हा  भला मोठा ग्रंथ  शिवकर बापुजी तळपदे यांनी वाचून काढला, आत्मसात केला आणि त्यावर त्यांनी प्रयोगही केले. त्यानीं शेवटी यशस्वीरित्या एक विमान बनवले ज्याच नाव  'मारुतसखा' असं ठेवलं  ते विमान १८९५ साली त्यांनी मुंबईतील जुहु येथील समुद्रकिनाऱ्यावर १५०० फुट उंच उडवले आणि ते  यशस्वीरित्या खाली सुधा उतरवले, ते विमान मानवरहित होते - त्यामध्ये कोणी बसले नव्हते आणि त्याचा पूर्ण कंट्रोल  शिवकर तळपदे यांच्याकडे होता, त्या विमानाला जमिनीवर उतरवत असताना कोणतीही हानी झाली आणि आणि त्यामध्ये आग सुद्धा लागली नाही हे विशेष होते.  हा प्रयोग पाहण्यासाठी  हजारो लोक जमले होते, त्यामध्ये तत्कालीन मुंबई  उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री महादेव गोविंद रानडे आणि गुजरात बदोडा येथील संस्थानिक श्री महाराजे गायकवाड यासह विसेक मान्यवर लोक होते. हे पाहिल्यानंतर लोकांनी  शिवकर  तळपदे यांना लोकानी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं, महाराजे गायकवाड यांनी त्यांना एका जहागीर बक्षीस भेट देऊ केली तेव्हा  शिवकर  तळपदे आपण अशी अनेक विमान बनवू शकतो मात्र आपली आर्थिक स्तिथी ठीक नसल्याचे सांगितले. आणि तेथे उपस्थित लोकांनी भरपूर पैसा गोळा  केला, त्याना आता आणखी विमान बनवण्यासाठी मदतीची गरज नव्हती.

             तेव्हा त्यांच्याबरोबर एक धोखा झाला तो म्हणजे तेव्हा ब्रिटिश राजवट होती त्यांची एक कंपनी होती 'रयाली  ब्रदर्स'. ती  कंपनी शिवकर  तळपदे यांच्याकडे आली आणि त्यांनी विमान बनवण्याचे 'drawing' त्यांना मागितले साहजिकच त्यांनी प्रश्न केला कशासाठी?  तर   'रयाली  ब्रदर्स' यांनी हे आपण तंत्र विकसित करू आणि हवी असलेली आर्थिक मदत कंपनीकडून देऊ असे आश्वासन दिले आणि एक समझोता करून घेतला,  तळपदे  हे खूप साधे गृहस्थ होते त्यांनी यावर विश्वास ठेवला आणि ते डिझाईन आणि  'drawing'  घेऊन कंपनी लंडनला गेली आणि  शिवकर तळपदे आणि कंपनी मध्ये  झालेला समझोता दोन्ही विसरली. 'रयाली  ब्रदर्स' कंपनीकडून ते डिझाईन आणि  'drawing'  लंडनहून अमेरिकेतील राईट बंधु च्या हाथी आले आणि त्यावरून राईट बंधुनी विमान बनवले आणि  आपल्या नावाने सर्व जगात रजिस्ट्रर केले. शिवकर तळपदे यांचं  दुर्दैव कि त्यानी या कंपनी वर विश्वास ठेवला.

       राईट बंधुनी हे बनवलेले विमान १७ डिसेंबर  १९०५ रोजी अमेरिकेतील 'साउथ क्यारोलिना' समुद्राजवळ उडवले जे फक्त १२० फुट उडाले आणि ते जमिनी वर कोसळले. आज जरी तांत्रिकदृष्ट्या विमान आणि त्याचे प्रकार खूप प्रगत झाले असले तरी त्याचा मुळ जनक त्यापासून वंचित राहिला. आजवर आपल्या देशातील बहुसंख्य लोकांची हीच शोकांतिका आहे कि हुशारी, असामान्यत्व  असून त्यांना वाव मिळत नाही. हे सर्व समजल्यानंतर अस वाटत लहान मुलांच्या धड्यात सर्व चुकीची माहिती काढून टाकावी आणि त्यामध्ये अजून एक माहिती अशी टाकावी कि विमानाचा शोध 'शिवकर तळपदे' या भारतीय व्यक्तीने लावला.  

                       शिवकर तळपदे यांच्या अखेरपर्यंत (१९१६) आणि मृत्यूनंतर हे 'मारुतसखा' विमान त्यांच्या घरी ठेवण्यात आले, पुढे ते विलेपार्ले येथे 'मारुतसखा' विमानाचे model प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले. यां संबधित चा एक दस्तेवज  हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ने जतन करून ठेवला आहे.